Posts

तिच्यातली 'ती' :– स्त्रीमनाच्या अंतरंगात डोकावणारा अनुभवगर्भ

Image
"तिच्यातली 'ती'" :– स्त्रीमनाच्या अंतरंगात डोकावणारा अनुभवगर्भ स्त्रीची कहाणी लिहिणं म्हणजे केवळ एक अनुभव नव्हे, तर एक प्रवास असतो.. समाजाच्या आरश्यात तिच्या प्रतिबिंबाचा शोध घेण्याचा, तिच्या गहिऱ्या भावनांचा, साशंकतेचा, आणि अंतर्मुखतेचा अन्वय लावण्याचा प्रवास. डॉ. राजश्री पाटील यांचा कथासंग्रह "तिच्यातली 'ती'" हा नेमका हाच अनुभव वाचकांसमोर मांडतो. सहज, तरी खोलवर भिडणारा! लेखिकेचे हे साहित्यिक पाऊल केवळ पुढे टाकलेलं नसून ते अंतर्मनाच्या गाभ्यातून उमटलेलं आहे. लहानपणात लिहिलेल्या कविता, छोट्या विनोदी गोष्टी, हस्तलिखित वह्या... त्या काळात आलेला चिमुकला टवटवीत अनुभव आता एका परीपक्व, जीवन अनुभवलेल्या लेखिकेच्या लेखणीतून नव्याने उमटतो. डॉ. पाटील या केवळ एक डॉक्टर नाहीत, त्या आहेत एक समजूतदार स्त्री, संवेदनशील आई, काळजीवाहू पत्नी आणि सर्जनशील लेखिका. त्यांचा सगळा प्रवासच हळूहळू लेखनाच्या दिशेने वळत गेला आहे. हा संग्रह म्हणजे त्यांच्या व्यस्त वैद्यकीय आणि कौटुंबिक आयुष्यातून साकारलेला अंतर्यात्रेचा एक संवेदनशील दस्तावेज आहे. या कथासं...

‘गोष्ट एका बजेटची’ :– हसऱ्या क्षणांतून जीवनाचे बोलके दर्शन

Image
‘गोष्ट एका बजेटची’ :– हसऱ्या क्षणांतून जीवनाचे बोलके दर्शन साहित्य म्हणजे केवळ गंभीर विचारांचे, दुःखद अनुभवांचे किंवा तात्त्विक चिंतनाचे व्यासपीठ नाही. साहित्य हसवतेही, खेळवतेही आणि नकळत विचार करायला भाग पाडते. प्रदीप जोशी यांचा ‘गोष्ट एका बजेटची’ हा पहिला कथासंग्रह हे याचे उत्तम उदाहरण ठरतो. शालेय जीवनापासून सुरू झालेली लेखनाची आवड सेवानिवृत्तीनंतर नव्या जोमाने उमलली. लेखनाचा वारसा सासरे प्र. दि. शिराळकर यांच्याकडून मिळाला, मित्र सुधीर कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले आणि पत्नी सुरेखा यांच्या प्रोत्साहनाने या संग्रहाचा जन्म झाला. पाठीशी आई-वडिलांचे आशीर्वाद असल्याने ही निर्मिती अधिक सक्षम झाली. या सर्व भावबंधांचा स्पर्श वाचकाला प्रत्येक कथेत जाणवतो. संग्रहात एकूण २१ कथा आहेत. हसवणाऱ्या, गुदगुल्या करणाऱ्या, उपरोधिक अशा या कथा वाचताना जीवनातील अनेक विरोधाभास नजरेसमोर येतात. हास्य हा गाभा असला तरी तो पोकळ नाही; त्यामध्ये सामाजिक भाष्य, मानवी स्वभावाची उपरोधपूर्ण मांडणी आणि ग्रामीण-शहरी वास्तवाचा धांडोळा आहे. कधी ‘आडगावची स्मशानभूमी’ गावात नवी स्मशानभूमी उभारल्यानं...

'फक्कड' :– नोंद नसलेल्या इतिहासाची जिवंत साक्ष

Image
'फक्कड' :– नोंद नसलेल्या इतिहासाची जिवंत साक्ष साहित्य हे केवळ मनाचे रंजन करणारे साधन नाही, तर ते समाजाच्या काळजावर उमटलेला सत्याचा ठसा असते. अशा ठशांपैकी एक जळजळीत आणि अस्वस्थ करणारा ठसा म्हणजेच सचिन अवघडे यांची कादंबरी ‘फक्कड’. ही केवळ एका पात्राची कथा नाही; ती आहे हजारो-लाखो उपेक्षितांच्या कष्टी, खडतर, आणि उपेक्षित आयुष्याची सामूहिक वहिवाट. ‘फक्कड’ या एका शब्दातच असंख्य उपेक्षितांचा, वंचितांचा, आणि श्रमिकांच्या आयुष्याचा आक्रोश दडलेला आहे. हा आक्रोश केवळ उपजीविकेचा नाही; तर तो आहे माणूस म्हणून ओळख मिळवण्याच्या संघर्षाचा.  कादंबरीचा नायक ‘फक्कडराव’ हा माणदेशाच्या कडाक्याच्या दुष्काळात जन्मलेला भूमिपुत्र. त्याच्या जीवनाची सुरुवात होते ती स्थलांतराच्या विवंचनेतून, ऊसतोडणीतील कष्टातून आणि उपेक्षेच्या जखमांमधून. काही कादंबऱ्या डोळे उघडतात; काही काळीज उघडतात. ‘फक्कड’ ही त्या दुर्मिळ कादंबऱ्यांपैकी आहे जी काळीज फाडून वाचकाला अंतर्मुख करते. सचिन अवघडे यांचे लेखन म्हणजे अनुभवांची रसरशीत पेरणी. त्यांनी भोगलेल्या वास्तवाचं शब्दशः पुनरुच्चारण. उसाच्या फडात झोपवलेली लेकरं आणि...

'काहूर' :- माणदेशाच्या मातीतील शब्दांची साद

Image
'काहूर' :- माणदेशाच्या मातीतील शब्दांची साद शब्द म्हणजे फक्त अक्षरांचा संग्रह नसतो. ते असतात अंतःकरणातील ध्वनी. काही ध्वनी हलकेसे काळजात घुसतात, तर काही उभ्या आयुष्याचा आरसा बनतात. मोहन गोपाळ घाडगे यांचा ‘काहूर’ हा कथासंग्रह म्हणजे अस्सल माणदेशी जीवनाचा असा आरसा आहे, जिथं पाणीटंचाई, अंधश्रद्धा, प्रेम, संघर्ष, शिक्षण, आणि मानवी भावभावना यांचं प्रखर चित्रण झालेलं आहे. 'काहूर' हा शब्दच जणू हाक घालतो. गावच्या शिवारातून, चिखलाच्या वाटांमधून, खळखळणाऱ्या ओढ्यातून आणि तळमळत्या मनातून. लेखकाच्या लेखणीतून उमटलेला हा 'काहूर' म्हणजे ग्रामीण जीवनाच्या व्यथा-वेदनांचा हुंकार आहे. घाडगे सर हे स्वकर्तृत्वावर ग्रामीण भागात शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांना शाळेच्या पटांगणापासून, गावकऱ्यांच्या बोलण्या-वागण्यातून आणि मुलांच्या डोळ्यांतून अनेक कथा दिसत गेल्या. ते अनुभव, निरीक्षणं, विचार यांचं बीज त्यांनी काळजीपूर्वक मनात पेरलं आणि त्यातून साकार झाल्या ‘काहूर’ मधील पंधरा कथा. या कथा वाचताना लेखकाने केवळ पाहिलेलं नाही, तर ‘अनुभवलं’ आहे हे ठळकपणे जाणवतं. जसं ...

भावनिक आणि प्रतीकात्मक वीण - 'संसद'

Image
भावनिक आणि प्रतीकात्मक वीण - 'संसद' भारताच्या लोकशाहीचा सर्वोच्च मंच म्हणजे संसद. पण हीच संसद, जिथं देशातील मूलभूत प्रश्न चर्चिले जावेत, निर्णय व्हावेत, ती अनेकदा केवळ गदारोळाचा, आरोप-प्रत्यारोपांचा आणि आक्षेपार्ह टीकेचा अखाडा बनते. लोकप्रतिनिधींनी लोकांच्या प्रश्नांसाठी उभं राहावं, त्यावर अभ्यासपूर्ण चर्चा व्हावी, हे अपेक्षित असतं. पण वास्तवात आपल्यासमोर जे उभं राहतं ते राजकारणाचं एक विकृत, दिशाहीन आणि धूसर चित्र असतं. अशा काळात, 'संसद' या लघुकादंबरीतून योगीराज वाघमारे यांनी एक अनोखा दृष्टिकोन आपल्या समोर मांडला आहे. गावगाड्यातील कट्ट्यावर रोज भरणारी "जनतेची संसद". ही लघुकादंबरी केवळ एका गावकथेसारखी नसून, ती ग्रामीण स्त्रीजीवनाचं संवेदनशील चित्रण करताना, सामाजिक बदलासाठी मनोमन झगडणाऱ्या स्त्रियांच्या अंतरंगाची सखोल मांडणी करते. ‘नांदुरकी’ या गावातील ‘भीमवाडी’तला एक साधा कट्टा. जेथे निवांतपणे म्हाताऱ्या बायका जमतात, चर्चा करतात, अनुभव शेअर करतात. हा कट्टा म्हणजेच या कथेची ‘संसद’ होय. देशाच्या उच्चसभागृहात न घडणारी चर्चा या कट्ट्यावर जीवंत होते, तीह...

'ओव्या दिनांच्या' :- आपल्या जाणिवांचा आणि मूल्यांचा दिनविशेष

Image
'ओव्या दिनांच्या' :- आपल्या जाणिवांचा आणि मूल्यांचा दिनविशेष आजच्या घाईगर्दीच्या, तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या जगात माणूस दिवसेंदिवस यांत्रिक होत चालला आहे. जीवनातील साधेपणा, संवेदना आणि संस्काराच्या जागा आता कृत्रिमतेने व्यापल्या जात आहेत. अशा काळात एखादे पुस्तक जिथे कवितांच्या माध्यमातून आपला इतिहास, संस्कृती, समाज आणि माणूसपणाचा धागा पकडते, त्या संग्रहाचं मोल शब्दात मांडणं कठीण आहे. सुधीर शेरे लिखित ‘ओव्या दिनांच्या’ हा असा एक वेगळा आणि ठसा उमटवणारा कवितासंग्रह आहे, जो केवळ साहित्यप्रेमींसाठी नव्हे, तर शिक्षण, संस्कार, सामाजिक जाणीव आणि मूल्य-शिक्षण यांची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी एक मौल्यवान ठेवा आहे. सण-वार, जयंत्या, पुण्यतिथ्या, संस्था स्थापना दिवस, जागतिक आरोग्य दिन, पर्यावरण दिन, महिला दिन, मानवाधिकार दिन, विज्ञान दिन हे सर्व दिवस आपल्याला कोणत्या ना कोणत्या ऐतिहासिक, सामाजिक किंवा वैज्ञानिक मूल्यांची आठवण करून देतात. मात्र ही माहिती केवळ कॅलेंडरात मर्यादित राहते, शालेय भाषणापुरतीच उरते, परंतु तिचं खरं मोल कधीच जाणवलं जात नाही. म्हणूनच सुधीर शेरे यां...

बालपणाच्या आभाळात विचारांचे सुंदर पंख लावणारा संग्रह - 'एक होती चिमणी'

Image
बालपणाच्या आभाळात विचारांचे सुंदर पंख लावणारा संग्रह - 'एक होती चिमणी' बालसाहित्य हे केवळ मुलांचे करमणुकीचे माध्यम नसून, त्यांच्या मनाच्या आकाराला दिशा देणारे, संस्कारांचे बीज पेरणारे, भावनिक व बौद्धिक विकासाचे गाढ स्वरूप असते. ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांचा ‘एक होती चिमणी’ हा बालकथासंग्रह ही या भूमिकेची एक उत्तम अभिव्यक्ती आहे. या संग्रहात समाविष्ट पाचही कथा बालकुमार वाचकांच्या मनावर नवा उमाळा, नवे विचार, आणि जीवनमूल्यांचा ठसा उमटवतात. संग्रहाच्या शीर्षककथेतील तहानेने व्याकूळ झालेली एक चिमणी केवळ पाण्यासाठी नाही, तर आपल्याला अंतर्मुख करणाऱ्या संदेशासाठी संपूर्ण निसर्गाच्या दारात जाते. विहीर, ओढा, नदी, धरण, पर्वत… परंतु तिला चोचभरही पाणी मिळत नाही. ही प्रतीकात्मक गोष्ट आहे. निसर्गाच्या कोमेजणाऱ्या, प्रदूषित होणाऱ्या अवस्थेची. चिमणीच्या उडण्यामागे आहे आजच्या पिढीची शोधयात्रा. नैसर्गिक समतोल, पाणीबचत, आणि पर्यावरणसंवर्धन या बाबतीत जागरूक होण्याची. शेवटी सर्व पक्षी मिळून वृक्षारोपणाचा निर्णय घेतात. हा समारोप म्हणजे आजच्या बालकांमधून उद्याचे हिरवे भविष्य घडवण्य...